इन्फोसिसच्या मालकीण सुधा मुर्ती म्हणतात नवरा बायको असाल तर तुमच्यात झालीच पाहिजे ही 1 गोष्ट, नाहीतर संसार तुटेल
![Image](https://static.langimg.com/photo/imgsize-2874288,msid-111451269/maharashtra-times.jpg)
प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या अनुभवातून आणि लिखाणातून अनेकांना प्रेरणा मिळते. आपल्या एका मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी असे म्हटले की कपल्समध्ये भांडण होत असेल तर त्यांचे नाते वाईट आहे असे नाही. उलट, भांडणामुळे त्यांचे प्रेम अधिक टिकते. भांडण ही कोणत्याही नात्यातील एक सामान्य बाब असते, पण त्यातून दोघांनी एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखले तर त्यांचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. सुधा मूर्ती यांच्या मते, भांडणातून प्रेम वाढते आणि नात्याची गोडीही अधिक टिकून राहते.सुधा मूर्ती यांच्या विचारांनुसार भांडणामुळे नात्यातील गैरसमज कमी होतात, प्रामाणिकता वाढते, समस्यांचे निराकरण होते, संवाद सुधारतो आणि नात्याचे मूल्यांकन होते. त्यामुळे भांडण ही नात्याची एक आवश्यक बाब आहे, ज्यामुळे नात्याची गोडी अधिक टिकून राहते. चला त र मग जाणून घेऊया की कशा प्रकारे भांडण करणाऱ्या कपल्समधले प्रेम वाढत जाते? (फोटो सौजन्य :- sudha_murthy_official)
Sudha Murthy Relationship Tips : प्रत्येक जोडपं आपापल्या पद्धतीने आपलं नातं जपत असतं. पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे नात्यात कमतरता निर्माण होतात. विशेषत: भांडण, पण सुधा मूर्ती यांनी त्यांच्या एका मुलाखतीत पती-पत्नीमधील भांडण आवश्यक असल्याचे म्हटले. पण असे का? जाणून घेऊया कारण.
0 Comments